सुस्वागतम्

निश्चयाचा महामेरु | बहुत जनांसी आधारू | अखंड स्थितीचा निर्धारु | श्रीमंत योगी ||

सोमवार, ८ जुलै, २०१३

श्री सद्गुरुवर्य समर्थ रामदास स्वामींना गुरुस्थानी मानावे असे शिवाजी महाराजांना सांगणारे तुकाराम महाराजांचे अभंग हे अभंग ! उठसूट समर्थांना अपशब्दांची लाखोली वाहणार्याा आणि समर्थ हे महाराजांचे गुरु नव्हते इत्यादी बरळणार्यां नी एकदा “तुकारामगाथे”तील हे अभंग वाचावे... ते अभंग पुढीलप्रमाणे :

विरंचीने केले ब्रह्मांड सकळ । तयामाजी खेळ नाना युक्ती ॥
युक्तिचे चालक तपोनिष्ठ ज्ञानी । गुरुभक्ती मनी विश्वास देशी ॥
ऐसा तुझा प्रेमा कळला हा एक । पाहूनिया लेख पत्रीचे की ॥
शिवा नाव तुझे ठेवीले पवित्र । छत्रपती सूत्र, विश्वाचे की ॥
व्रत तप नेम ध्यान योग केला । करूनी मोकळा झालासी तू ॥
हेत हा लागला आमुचिये भेटी । पत्रामाजी भेटी हीच थोर ॥
याचे ही उत्तर ऐके बा भूपती । लिहीतो विनंती हेताची हे ॥
अरण्यवासी आम्ही फिरू उदासिन । दर्शन हे हीन अमंगळ ॥
वस्त्रावीण काया झाली ही मळीण । अन्नाविणे जीणे फलाहारी ॥
रोड हात पाय दिसे अवकळा । काय तो सोहळा दर्शनाचा ॥
तुका म्हणे माझी विनंती सलगीची । वार्ता ही भेटीची करू नका ॥
ऐसी माझी वाणी दीनरूप आहे । करुणा त्या आहे हृदयस्थाशी ॥
न हो केविलवाणे, न हो आम्ही दीन । सर्वदा शरण पांडुरंगी ॥
पांडुरंग आम्हा पाळीता पोशिता । आणिकाची कथा काय तेथे ॥
तुझी भेट घेणे काय हो मागणे । आशेचेही शून्य केले तेणे ॥
निराशेचा गाव दिधला आम्हाशी । प्रकृती भावाशी सोडीयेले ॥
पतिव्रता मन पतिशीच भेटो । तैसे आम्ही विठोमाजी नांदो ॥
विश्व हे विठ्ठल दूजे काही नाही । देखणे तुझे ही तुजमाजी ॥
तुज ही विठ्ठल हवा ऐसा वाटे । परी एक मोठी आवडीची ॥
सद्गूरू श्री रामदासाचे भाषण । तेथे घाली मन चळू नको ॥
बहुतांची वृत्ती चाळविली जेव्हा । रामदास्य तेव्हा घडे केवि ॥
तुका म्हणे बापा चातुर्य सागरा । भक्ति एक थारा भाविकांसी ॥
तुम्हांपाशी आम्हां येऊनिया काय । वृथा शिण आहे चालण्याचा ॥
मागावे हे अन्न तरी भिक्षा थोर । वस्त्राचाही थार चिंध्या बिदी ॥
निद्रेसी आसन उत्तम पाषाण । वरी हे प्रावर्ण आकाशाचे ॥
तेथे काय करणे कोणाचाही आस । वाया होय नाश आयुष्याचा ॥
राजगृहा यावे मनाचिया आशे । तेथे काय वसे समाधान ॥
राजाचिये गृही भाग्यवंता मान । इतरां सन्मान नाही तेथे ॥
देखोनिया वस्त्राभूषणाचे जन । तत्काळ मरण येते आम्हां ॥
ऐकोनिया मनी उदासावे जरी । तरी आम्हां हरी उपेक्षि ना ॥
आता हेची तुम्हां सांगेन कौतुक । भिक्षेएवढे सुख नाही नाही ॥
तपव्रतयोगे महा भले जन । आशाबद्ध लीन वर्तताती ॥
तुका म्हणे तुम्ही श्रीमंत मानाचे । पूर्वील देहीचे हरीभक्त ॥
आता एक योग साधावा हा नीट । भल्याचाही वीट मानू नये ॥
जेणे योगे तुम्हां लागू पाहे दोष । असा हा सायास करू नको ॥
निंदक दूर्जन सांगाती असती । त्यांच्या युक्ती चित्ती आणू नका ॥
परिक्षावे कोण राजाचे सेवक । विवेकाविवेक पाहूनिया ॥
सांगणे नलगे सर्वज्ञ तू राजा । अनाथांच्या काजा साह्य होशी ॥
हेची ऐकोनिया पावे समाधान । आता या दर्शना काज नाही ॥
घेऊनिया भेटी कोणा हा संतोष । आयुष्याचे दिवस गेले गेले ॥
एक-दोन कर्मे जाणॉनिया वर्मे । आपुलिया भ्रमे राहे आता ॥
कल्याणकारक अर्थ याचा एक । सर्वांभूति देख एक आत्मा ॥
आत्मारामी मन ठेवूनिया राहे । रामदास पाहे आपणची ॥
तुका म्हणे राया धन्य धन्य स्थिती । त्रैलोक्य ही ख्याती कीर्ति तुझी ॥
राया छत्रपती ऐकावे वचन । रामदासी मन लावी वेगी ॥
रामदास स्वामी सोयरा सज्जन । त्याशी तनमन अर्पी बापा ॥
मारुती अवतार स्वामी प्रगटला । उपदेश केला तुजलागी ॥
रामनाम मंत्रतारक केवळ । झालासे शीतळ उमाकांत ॥
उफराटे नाम जपता वाल्मिक । झाला पुण्यश्लोक तात्कालीक ॥
तोची बीजमंत्र वसिष्ठ उपदेश । याहुनी विशेष काय आहे ॥
आता धरू नको भलत्याचा संग । राम पांडुरंग कृपा करी ॥
धरू नको आशा आमची कृपाळा । रामदासी डोळा लावी आता ॥
तुझी चाड आम्हां नाही छत्रपती । आम्ही पत्रपती त्रैलोक्याचे ॥
चारी दिशा आम्हां भिक्षेचा अधिकार । नेमिली भाकर भक्षावया ॥
पांडुरंगी झाली अमुची हे भेटी । हातात न रोटी दिली देवे ॥
आता पडू नको आमुचिये काजा । पवित्र तू राजा रामभक्त ॥
विठ्ठलाचे दास केवळ भिकारी । आम्हां कधी हरी उपेक्षि ना ॥
शरण असावे रामदासालागी । नमन साष्टांग घाली त्यासी ॥
तुका म्हणे राया तुज असो कल्याण । सद्गुरु शरण राहे बापा ॥

संदर्भ : तुकारामगाथा : (संपादक- त्र्यंबक हरी आवटे)
(© कौस्तुभ कस्तुरे । kasturekaustubhs@gmail.com यांच्या सौजन्याने)

मंगळवार, २५ जानेवारी, २०११

स्व भाषा मराठीची दुरावस्था

मातृभाषे बद्दल असणारा आदरभाव व्यक्त करताना ज्ञानेश्वर म्हणतात
||माझ्या मर्हाठीच्या बोलू कवतुके परि अमृताते पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळवीन||
अशी हि आपली मातृभाषा मराठी भाषा आज वेगळ्या वळणावर येऊन प्रवास करत आहे, समस्त आपल्या पुत्रांना साद घालतेय व आपली व्यथा सांगण्याचा प्रयत्न करतेय, पण तिच्या पुत्रांना तिच्यासाठी वेळ काढायला फुरसतच नाही!!!!!
कविवर्य सुरेश भट म्हणतात "लाभले भाग्य बोलतो मराठी | जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी || धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी | एवढ्या जगात माय मानतो मराठी||
स्वातंत्र्यपूर्वकालपासून या देशातील शिक्षणपद्धती बदलली पाहिजे , असा आक्रोश सर्वत्र चालू आहे. मातृभाषा हेच शिक्षणाचे माध्यम राहील ही मागणी राज्यकर्त्यांनी मान्य केली होती. परंतु उच्च शिक्षणाचे इंग्रजीचे स्तोम कायम ठेवून शालान्त शिक्षणापर्यंत मातृभाषेचा स्वीकर करून समाजाच्या तोंडाला पाने मात्र पुसण्यात आली. लोकांची मागणी मान्य केल्याचे चित्र मात्र उभे करण्यात आले. निर्णय घेणाऱ्या संबंधितांनी मात्र आपल्या मुलांसाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळाच पसंत केल्या व अधिकाराची क्षेत्रे वंशपरंपरेने आपल्याकडेच राहतील अशी व्यवस्था केली. अशाप्रकारे राज्यशासनात इंग्रजीचे महत्त्व वाढल्यामुळे परिणाम असा झाला की, महाराष्ट्रातल्या मुंबईसारख्या शहरांकडे परप्रांतीय इंग्रजीप्रेमी लोकांची रीघ लागली. या परप्रांतीयांना सुवर्णसंधीच मिळाली. या मंडळींनी मुंबई शहरावर ताबा मिळविला, हे स्वातंत्र्योत्तर काळातील चित्र आहे. ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे, अशा मंडळींनी इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा आश्रय घेतला. आपल्या मुलांच्या भावितव्याचा विचार करण्याइतकी सवड असणाऱ्यांनी पोटाला चिमटा घेऊन आपल्या मुलानांही या शाळेत पाठविले. यामुळेच मुंबईत इंग्रजी माध्यमाच्या शाळा उभ्या राहिल्या व या पापात भर पडली. खरे म्हणजे सुरूवातीपासून इंग्रजी या एका विषयाचा उत्तम अभ्यास त्यांनी केला तर इंग्रजी विषयाबद्दल आत्मविश्वास निर्माण होऊ शकतो. मराठी तरुण पिढीने इंग्रजी भाषेचा उत्तम अभ्यास करावा, पण इंग्रजी माध्यमाचा आग्रह धरू नये.

आपण सर्वांनी प्रथम  हे जाणून घेतले  पाहिजे कि इंग्रज ज्यावेळी ह्या भारत देशात आले, त्यावेळी ते ठरवूनच आले कि या देशास  स्वतंत्र दिल्यानंतर हा देश त्यांची अस्मिता, सांस्कृतिक परंपरा विसरून आपल्या भाषेच्या दास्यातून कधीच मुक्त होणार नाही याची तजवीज करण्याची काळजी त्यांनी घेतली होती. गवर्नर  लॉर्ड मेकॉले याच्या भाषणातून आपल्याला जाणवते.   त्याचा हेतू चांगला नव्हता २ फेब्रु. १८३५ ला ब्रिटीश पार्लमेंट मध्ये त्याने केलेल्या भाषणात तो म्हणाला :
I have travelled across the length and breadth of India, and I have not seen one person who is a beggar, who is a thief.  Such wealth I have seen in this country, such high moral values, people of such high calibre, that I do not think we would ever conquer this country, unless we break the very backbone of this nation, which is her spiritual and cultural heritage; and therefore , I propose that we replace her old and ancient educatioin system, her culture, for if the Indians think that in foreign and
English is good and greater than their own, they will lose their own self esteem, their native self-culture and they will become what we want them, a truly dominated nation.

 हीच लोड मेकॉलेची शिक्षण पद्धती शासन दरबारी रूढ होऊन आज आपल्या मानगुटीवर बसली आहे.
यावर आपले मत प्रदर्शित करताना पण कोणत्याही प्रकारचा विरोध अथवा कृती न करता महात्मा गांधीनी १९२१ साली त्यांचा "यंग  इंडिया" मध्ये लिहिलेल्या लेखामध्ये म्हटले  :
परक्या भाषेच्या माध्यमाने आमच्या मुलांच्या बुद्धीवर आणि त्यांच्या एकून शक्तीवर विलक्षण ताण पडून ती  थकून जातात .  हे परके माध्यम त्यांना केवळ पोपटपंची आणि अनुकरण करायला शिकवते. कोणत्याही प्रकारचा  मुलभूत विचार अथवा कृती करण्यास ती असमर्थ ठरतात आणि आपले ज्ञान आपल्या लोकापर्यंतच नव्हे तर कुंटबियापर्यंतहि पोहोचू शकत नाहीतपरक्या भाषेच्या माध्यमाने हि मुले आपल्या स्वत:च्या देशातच परकी झालेली आढळतातहा मोठाच दैवदुर्विलास आहेह्या परक्या भाषेने देशीय भाषांची वाढच कुंठीत केली आहेमला जर सर्वंकष सत्ता प्राप्त झाली तर मी प्रथम हि परक्या भाषेतून शिकवण्याची पद्धत ताबडतोब बंद करीन आणि मातृभाषेतून शिकवण्याची सक्ती करीनपाठ्यपुस्तकासाठी मी थांबणार नाहीती या बदलामागोमाग येतीलच. परक्या भाषेचे हे संकट ताबडतोब दूर होणे आवश्यक आहे

मराठी भाषा  हीच मातृभाषा म्हणून शिक्षणाचे माध्यम हवे, कारण आपल्या भाषेतून जेवढे शिकता येईल तेवढे परकीय भाषेतून शिकणे लहान बालकांना जड जाईल.  घरात एक भाषा व शाळेत वेगळी भाषा लहान बालकांच्या मनावर परिणाम घडवून आणते व ते बालक सुरुवातीची काही वर्षे एका वेगळ्याच मानसिकतेतून जाते, ह्या  सर्व परिणामांना आपण पालकच सर्वस्वी  जबाबदार असतो.
मुलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मातृभाषा हेच शिक्षणाचे मध्यम असले पाहिजे हे समाजातील विचारवंतानी आणि अभ्यासकांनी मान्य केले आहे, असे असताना अनेक सामान्य जनतेचा ओढा परकीय भाषेकडे दिसून येतो.
महाराष्ट्रातच नाही भारताच्या इतर भागात इंग्रजी माध्यमाचे भूत भारतीयाच्या मनावर पकड घेत चालली  आहे. लहानग्यांच्या कोवळ्या निरागस मनाचा विचार करता आपली आर्थिक ताकद बघता इंग्रजी माध्यमात प्रवेश घेण्याकडे कल भारतीयांच्या मानसिकतेत दिसून येतो.

रवींद्रनाथ टागोर यांनी सुद्धा आपल्या मातृभाषेबाबत म्हणताना असे  उधृत केले कि
शिक्षणाची भाषा आणि बालकाची भाषा यांच्यात फरक केलेला जगात भारताशिवाय दुसरा देश नाहीपाच्शात्य ज्ञानाकडे वळलेल्या जपानला पुरती शंभर वर्षेही लोटलेली नाहीत पण शिक्षणाकरिता स्वदेशीवर निर्भर राहायचे असा त्याचं निर्धार होता, कारण असले शिक्षण त्यांना काही निवडक नागरिकापुरते शोभेची वस्तू म्हणून नको होते तर सर्वच नागरिकांना समर्थ आणि सुसंकृत करण्यासाठी हवे होतेफारच थोड्यांच्या आवाक्यात येऊ शकेल असे परकी भाषामाध्यम  चालू ठेवण्याचा मूढपना तर त्यांनी मुळीच केला नाही.
मराठी या विषयावर मराठी जनतेला भडकावून राजकारण करणारे पक्ष अशा महत्वाच्या विषयावर सोयीस्कर दुर्लक्ष करताहेत व याचाच फायदा सरकारने घेऊन आपल्या मनमानी कारभाराने समस्त मराठी जनतेला वेठीस धरले आहे. मराठीचा सार्थ अभिमान बाळगणाऱ्या समस्त मराठी जणांनी या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे, अन्यथा आपल्या हातून वेळ गेलेली असेल.

मंगळवार, २८ डिसेंबर, २०१०

मी मराठी

दि. २८ डिसेंबर २०१० सांयकाळ चा किस्सा दादरच्या एस के बोले रोडवर असलेल्या चहाच्या टपरीवर चहा घेत उभा होतो. पदपथाच्या कडेला कपाळावर शेंदुराचा नाम लावलेल्या तारुण्याच्या भरात असलेल्या एका व्यक्तीला एका परप्रांतीय मालकी असलेल्या गाडीने धक्का दिला. क्षणात त्या शेंदूरधारी व्यक्तीचा स्व जागा झाला आणि त्यांनी त्या साठीच्या घरात असलेल्या व्यक्तीच्या मुस्कटात लगावली आणि वरून आवाज नकोय फटके देऊ असे सुनावले गाडी चालवणारा मालक त्या वयस्कर व्यक्तीचा पुत्र होता व तो माझ्या वडिलांना मारू नका चुकी माझी आहे अशी विनवणी करत होता तरीही ह्या मी मराठी म्हणणाऱ्या शेंदुर्धारी व्यक्तीची गुर्मी कमी होत नव्हती. 
        कधी कधी आपण मराठी असल्याचा गर्व आपणास अति होतो आणि त्या गुर्मितून अश्या प्रकारच्या घटना आपल्यासमोर घडत असतात.  आपली हि मराठी असल्याची ताकद आपण आपल्या मराठी बांधवाच्या विधायक कार्यासाठी जर वापरली तर मराठी समाजाचे पर्यायाने महाराष्ट्राचा विकास नक्की करू.
        आता कालची घटना घ्या, काल पुणे महानगरपालिकेत राडा झाला.  राडे करणारे  कोण तर सर्वपक्षीय मराठे  कारण काय तर दादोजी कोंडदेव. संभाजी ब्रिगेड समाजामध्ये दुही पसरवण्याचे काम करतय, याची जाणीव समस्त मराठा समाजाला आहे आणि असणारच.   ब्राह्मण आणि   ब्राह्मणेतर असा वाद संभाजी ब्रिगेडने सुरु करून मराठा समाजाला वेठीस धरले आहे.  मुळात ब्राह्मण समाज शांतताप्रिय, हुशार, संयमी  व प्रामाणिक आहे याची प्रचीती इतिहास देत आहे व मी जवळून ब्राह्मणी समाज अनुभवलाय, निरीक्षण केलेय.      
     शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करताना जातीभेद केला नाही, उलट स्वराज्यात मुसलमानाचा  सुद्धा समावेश करून घेतला होता.  शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात ब्राह्मणी चेहरे होते व वेळोवेळी त्यांची सल्लामसलत करूनच शिवाजी महाराज निर्णय घेत होते याही साक्ष इतिहास देत आहे.  मग दादोजी कोंडदेव यांना लक्ष्य करून समस्त ब्राह्मणी समाजाला त्रास द्यावयाचा हे कशात बसते. 
     मुळात आपल्या सगळ्या मराठी जनाची मानसिकता आपण सर्वांनी तपासण्याची आवश्यकता वाटू लागली आहे.  जे राष्ट्र इतिहास  विसरते ते राष्ट्र लयास जाते, अशा प्रकारे संतानी इतिहासाचे महत्व वर्णन केले आहे.  आपल्या महाराष्ट्राचा इतिहास, आपल्या देशाचा इतिहास जो काही आहे तो इतिहास हा त्या त्या वेळी त्या वेळच्या बखरकारांनी नमूद करून ठेवलेला आहे.  हा सर्व इतिहास बदलण्याचा आपल्याला काय अधिकार? आणि यासाठी सत्तेचा दुरुपयोग करून अट्टाहास करून हिंसा करावयाची आणि इतिहास बदलण्यास भाग पाडावयाचे.  
कुणीही  संघटना काढावी व त्या संघटनेच्या जोरावर दहशतवाद पसरवायचा आणि जनतेला चुकीचा मार्गदर्शन 
करायचे व त्यातून हिंसेचा मार्गाचा अवलंब करून आपला उद्देश्य सध्या करायचा हे कुठवर चालणार.  
मी मराठी म्हणणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने याचा अभ्यास करून जाब विचारण्याची वेळ आली आहे अन्यथा   
हा चुकीचा पायंडा पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात सुरु झालेला आहे आणि याला वेळीच पायबंद घातला 
गेला नाही तर महाराष्ट्राची प्रगती   होणार नाही याची प्रकर्षाने नोंद घ्यावी लागेल.  
http://maharashtratimes.indiatimes.com/photo.cms?msid=7183644

सोमवार, २० डिसेंबर, २०१०

राहुल गांधी यांस अनावृत्त पत्र

       राहुल बाळा, तू वयाची चाळीशी गाठलीस पण तुझा बालपणीचा अल्लडपणा अजून गेलेला दिसत नाही. अन्यथा एखाद्या परदेशी राजदुतासमोर तू आपल्याच देशबांधवांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून, त्यांच्यावर आरोपांची चिखलफेक केली नसतीस. मागे तू म्हणे भारताचा ‘शोध’ घेण्यासाठी देशभर हिंडलास. इतकेच नव्हे तर दलिताच्या घरी जेवून, तू बातमीसाठी हपापलेल्या आणि सतत कुत्र्याप्रमाणे तुझ्या अवती-भवती फिरणाऱ्या पत्रकारांना ‘ब्रेकिंग न्यूज’ दिलीस. अगदी काही दिवसांपूर्वी तू सुद्धा देशातील ‘सर्वसामान्य’ लोकांप्रमाणेच ट्रेन मधून प्रवास केल्याचे कळते. अरे मग एवढे फार्स करून सुद्धा तुला आपला देश, इकडची संस्कृती कळली नाही का?  

   

        तुझे खापरपणजोबा मोतीलाल नेहरू हे तत्कालीन काँग्रेसमधले वजनदार आणि प्रगल्भ नेतृत्व समजले जाई. त्यांचा वारसा उचलणारे तुझे पणजोबा आणि स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी उच्चशिक्षण घेतले ते विदेशातच. त्यानंतर क्रमश: तुझी आजी इंदिरा गांधी, तुझे वडील आणि काका, राजीव व संजय गांधी यांच्यावर सुद्धा भारतीय संस्कृती आणि शिक्षणपद्धतीपेक्षा पाश्चात्य विचारसरणीचा मोठा प्रभाव होता. तुझ्या मातोश्री आणि तुम्ही दोघेही भावंड यांना ‘भारतीय’ म्हणावे का, असा प्रश्न आम्हाला सुरवातीला पडलेला. 

       मग हळुहळू वाटायला लागल की, जरी तुम्ही परदेशी असलात तरी भारतीय मूल्यांचा तुमच्यावर सुद्धा प्रभाव पडला आहे. अरे खरचं.....!!!  अस कर ना, तू तुझ्या पणजोबांनी लिहिलेले ‘भारताचा शोध’ हे पुस्तक वाच. त्यांनी शक, हूण, कुशाण इथपासून मुघल राजा अकबर या सर्व बुभुक्षित विदेशी आक्रमकांचे भारतीय तत्त्वज्ञानामुळे झालेले हृदयपरिवर्तन मोठ्या गौरवाने लिहिले आहे. हे वाचताना कदाचित तुझी नजर नेहरूंनी केलेल्या छ. शिवाजी महाराजांच्या उल्लेखावर जाईल. पण शिवाजी महाराजांचा तुझ्या आजोबांनी ‘वाट चुकलेला देशभक्त’, असा उल्लेख हा केवळ ‘प्रिंटिंग मिस्टेक’ आहे, असे समजून तू तिकडे सोयीस्कर दुर्लक्ष करशील याची खात्री मला आहेच. 

अरे मुद्दा भरकटलो बघ..!! थोडक्यात काय तर असा आमचा देश. आता तुच त्याला आपला मानतोस की काय, ते मला माहीत नाही. पण तुझा गृहपाठ खूपचं कच्चा असल्याचे जाणवले. हिंदू सहनशील वगैरे आहेत खरे, पण त्यांचे मर्दानी रूप मुघल आणि इंग्रजांनी अनुभवले आहे. आम्ही शूर असलो तरी क्रूर नाही बर का? मग आम्ही आमच्याच देशात बॉम्बस्फोट घडवू, असा जावईशोध तुला कसा लागला बरे? भारत भ्रमण करताना एखादा बॉम्बनिर्मिती कारखाना तर नाही ना पाहिलास?

        अरे १९४७ सालापासून आजगायत आमच्या देशावर भ्याड हल्ले करणाऱ्या पाकिस्तानच्या अब्रुची लक्तरे आत्ता कुठे जागतिक वेशीवर टांगली जात असताना तू हिंदुंना आणि पर्यायाने समस्त भारतीयांनाच अतिरेकी कसे ठरवू शकलास? आम्ही ज्या भगव्या ध्वजाची शान मिरवतो ना, तो ध्वज अशी पुचाट कृत्य करण्याची बुद्धी आम्हाला कधीच देणार नाही. राहता राहिला प्रश्न तुझ्या वक्तव्यांचा. त्यावर तू महात्मा गांधींचे विचार नक्की वाच. तू आमूलाग्र बदलशील.

        हिंदू संस्कृती, परंपरा आणि हिंदू मन यांचा नेमका अर्थ तुला जेव्हा कळेल, तेव्हाच तू राजकारण करू शकशील. त्यासाठी तू इथल्या जनतेशी, त्यांच्या भावविश्वाशी आणि समस्यांशी समरसून जायला हवे. तरच कदाचित तुला राजकीय परिपक्वता येईल.